Thursday, March 27

जागृत ??


भारत माझा देश आहे
हि प्रतिज्ञा कालबाह्य ठरत आहे
देश ठेल्यांवर विक्रीस मांडलेला पाहून
असे जनता ग्राह्य धरत आहे
"राजनीतीच भ्रष्ट आहे" म्हणायचा
अधिकार कायद्याने दिलेला आहे
आणि म्हणतांना मात्र विसरतो
"भ्रष्टांचा" आम्हीच पुरस्कार केलेला आहे
दर पाच वर्षांनी युद्ध पेटते येथे
अशा अनेक युद्धांना देश सामोरे गेलेला आहे
गोळी शरीर न चिरतात हृदय छेदते
तेव्हा अंतर यातनेनच भारतीय मेलेला आहे
पण भातुकलीच दोर आता आम्ही हातात घेऊ
हातपाय हलवायचा वेड लागलेला आहे
नाही म्हणता म्हणता किती दिवसांनी
भारतीय माणूस जागलेला आहे
"मी" चे आम्ही होऊन दाखवू
युवा रक्ताला चेव फुटलेला आहे

"भारत आमचा देश आहे"
संदर्भ: हा आत्ताच झोपेतून उठलेला आहे...

No comments:

Post a Comment